चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले….!
न. प. ला सुधारकांच्या नावाची
“ऐलजीं ” आहे का?
रोखठोक
प्रा. महेश पानसे
मुल : ज्या कामाची गरज आहे ते करायचे नाही व ज्या कामावर शहरवासीयांना आक्षेप आहे अशा कामांसाठी वळवळ करायची. एवढ्यात न. प. प्रशाशनास ही सवय जडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
घनकचऱ्यातून जनतेच्या पैशाचा निचरा करण्यासाठी गत 2 महिन्यापासून घामाघूम होऊनही धावपळ करणाऱ्या न. प. प्रशाशनास क्रांतिसूर्य क़ांतीज्योती फुलेंच्या नावाने चौकाचे सौदयींकरण करण्यात अडसर निमाॅण करण्यात आनंद मिळत आहे का? असा संतप्त सवाल शहरात उपस्थित होत आहे. या महान सुधारकांच्या नावाची न. प. ला ” ऐलजीं ” आहे की यातही ठेकेदाराची अडवणूक करून आधी ‘सरेंडर करायला लावण्याचा ” अर्थ ” पूर्ण हेतू आहे का? अशी भावनिक विचारणा होताना दिसते.

9 महिने लोटले फूले चौकाचे सौदयींकरण करण्यासाठी 25 लाखाचा निधी तयार आहे. कल्याणी मजूर संस्थेला आक्टो. 2025 ला बांधकाम सुरू करण्यासाठी कार्यआदेश देण्यात आला आहे. सा. बा. उपविभाग निधी खर्च करायला एका पायावर तयार आहे. मात्र न. प. प़शाशनाने खुटी मारुन ठेवल्याने फुले चौकाचे सौदयींकरण रखडल्याची बाब दुदैवाने पुढे आली आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे क़ांतीसुयॅ महात्मा फुले व क़ांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना पुढे पुढे करणारी नगरसेवक मंडळी व बहुसंख्येने असलेल्या माळी समाजाच्या(ओबीसी) कृपेने नगराध्यक्ष पदावर आरूढ झालेली सावित्रीबाईंची लेक नगराध्यक्ष पदावर असताना महान सुधारकांच्या नावांची विटंबना करणे कितपत योग्य ठरते? हा सवाल वेदनादायी ठरतो. न. प. ला या सौदयींकरण कामातील अडसर दूर करायला कितीसा वेळ लागेल, दोन दिवसात कामात अडसर ठरलेला न. प. चा बिऱ्हाड उचलायला पुरेशा आहे. मात्र 9 महिन्याचा कालावधी लोटूनही न. प. ने कुठल्या उद्देशाने अडंगा टाकला हे तरी स्पष्ट करावे. प़शाशक काळात फुले चौकाचे सौदयींकरण मंजूर झाले. त्यावेळी ज्या तत्परतेने मुख्याधिकारी महोदयांनी पुढाकार घेतला ती तत्परता ” न. प. वर बाॅडी” बसताच लयास का जावी?


