अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्यावी :- नितीन येरोजवार
सतीश राजुरवार उप संपादक
मुल : मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण भात व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असुन सर्व पिके पाण्याखाली येऊन जमीनदोस्त झाली आली आहे या प्राश्वभूमिवर बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार व तालुका प्रमुख राजेश ठाकरे , शिवसेना (उ.बा.ठा) शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संपूर्ण तालुक्याच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता शेतकर्यांचे उभे पिक पाण्याखाली जमीनदोस्त झालेल्या असुन त्यांच्या हातात पिक काही येण्याची शक्यता नाही ,अगदी कापणीच्या वेळेवर पाऊस खूप पडल्याने सर्व पिक उध्वस्त झाले आहे . धान कापणी करून ठेवण्यात आलेले व उभे धान असलेले अति प्रमाणात पावसामुळे धान जमीनदोस्त झालेले आहे तरी प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार व तालुका प्रमुख राजेश ठाकरे यांच्या नेतृत्वात मुल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यांच्या हातात आलेला घास हिरावला गेला त्यामुळे धान,कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना सरसकट कोणतेही निकष न लावता , 50 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी तसेच सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदन देताना शहर प्रमुख बादल करपे ,उपतालुकाप्रमुख रवी शेरकी,सुशी सरपंच अनिल सोनुले,उपतालुकाप्रमुख संदीप निकुरे ,माजी तालुका प्रमुख सुनील काळे, महेश चौधरी,तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले,दिशांत पुण्यापवार व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.



