चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत या महत्वकांक्षी अभियानाचा आज मौजे मोरवा ग्रामपंचायतीतून चंद्रपूर जिल्ह्यात शुभारंभ केला. राज्याचे लोकाभिमुख मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून ग्रामविकासाला नवी दिशा देण्यासाठी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आला आहे.


या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपयाचे बक्षीस शासनाकडून दिले जाणार आहे. गावाच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या रक्कमेचे बक्षीस देणारे हे देशातील एकमेव अभियान आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येक गावाने बक्षिसासाठी नव्हे, तर गावाच्या विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करावे, प्रत्येक गाव समृद्ध झाले, तर राज्यही समृद्ध होईल.’असे आवाहन यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे सरपंच, गावकरी यांना केले.


