राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात मूल उपजिल्हा रूग्णालय अव्वल…..
वाहन पुरविण्यात मात्र शासनाची ” झोल” ?
आरोग्यम
महेश पानसे.
महाराष्ट्र शासनाने 2008 पासून राज्यात ” राष्ट्रीय बाल स्वास्थ कायॅक़म” ( RBSK) सुरू केला आहे. यात तालुका स्तरावर तालुक्यातील आंगणवाडी व प़ाथमिक शाळांमधील विदयार्थ्यांच्या अनेक गुंतागुंतीच्या स्वास्थ्य समस्या मोफत दूर करण्यासाठी आरोग्य विभाग तळमळीने धावपळ करीत असतो. आजमितीस अनेक विद्यार्थी कोकीळाबेन हापस्पिटल’ सारख्या
अतीखचींक रुग्णालयात मोफत उपचार घेऊन दुधॅत रोगांवर उपचार घेऊन सामान्य जिवणाच्या प़वाहात जगत आहेत. यामागे ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालये यांची अपार मेहनत कामी आली आहे व येत आहे. शासनाने 2008 साला पासून सदर स्वास्थ्य उपक्रम सुरू केला खरा मात्र या पथकाला काम करण्यासाठी वाहन व्यवस्था सुद्धा उपलब्ध नसल्याची शोकांतिका संताप व्यक्त करण्यासाठी पुरेशी ठरते. जेव्हा की या आरोग्यदायी कायॅक़म पथकात एक पुरुष व एक
महिला वैद्यकीय अधिकारी यांचेसह अनेक वैद्यकीय अधिकारी व कमॅचारी यांचा समावेश तालुका स्तरावर असतो. वषाॅतून दोनदा आंगणवाडी केंद्र व एकदा तालुक्यातील संपूर्ण शाळांमध्ये एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून गुंतागुंतीचे दुधॅर उपचार मोफत करण्यात येतात. प़संगी राज्यातील नामांकित खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करून दुधॅर रोग, जन्मजात व्यंग, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून बालकांना आरोग्य प़वाहात आणल्या गेले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कायॅक़मा अंतगॅत प्रत्येक तालुक्यात शेकडो अंगणवाडी केंद्र व शाळांची तपासणी होत असते. हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. मात्र दोन वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या या पथकाला साधी वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात शासन
‘ झोल’ खात असल्याने सवॅत्र संताप व्यक्त होताना दिसतो. जिथे गरज नाही अशा ठिकाणी विशेष वाहने पुरविण्यात येतात मात्र लहान बालकांना जीवनदान देणाऱ्या सदर यंत्रणेला साधी वाहन व्यवस्था पुरविण्यात हयगय करणाऱ्या आरोग्य यंत्रणेची छी थू झाल्यास नवल नाही.
जिल्ह्यात मूल उपजिल्हा रूग्णालय कौतुकास पात्र.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कायॅक़मात मूल उपजिल्हा रूग्णालय जिल्ह्यात सरस ठरला असून कौतुकास पात्र ठरला आहे. तालुक्यातील 173 अंगणवाडी केंद्र व 107 प़ाथमिक शाळांमधून शासकीय धोरणानुसार वैद्यकीय तपासणी करून तालुक्यातील अनेक गोर गरीब विद्यार्थ्यांना दुधात रागातून मुक्त
करण्यात मूल उपजिल्हा रूग्णालयातील या चमूने विशेष प्रयत्न केले आहेत. अनेक बालकांना प़संगी एम्स, महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार, मुख्य मंत्री मदत निधी मधून उपचार देणयात मूल उपजिल्हा रुग्णालय चमूने आपली भूमिका पार पाडली आहे. आजमितीस अनेक हदयरोगी बालक, दुधॅररोगी बालक, यांना सामान्य जीवनाच्या प़वाहात आणण्यात उपजिल्हा रुग्णालय मूल च्या चमूची भूमीका शाशन स्तरावर
गौरवांकीत झाली आहे. मूल उपजिल्हा रुग्णालय चमूला सुदधा शासनाकडून वाहन व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. पथकातील सर्व अधिकारी आपापल्या वाहनाने तालुक्यात भ़मण करतात. अडचणींवर मात करून बाल गोपालांच्या आरोग्याकरीता झटणाऱ्या या चमूचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मूल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ उराडे
यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कायॅक़मात काम सुरू आहे. वाहन व्यवस्था उपलब्ध नाही, या चमूत महिला वैद्यकीय अधिकारी सुद्धा उपलब्ध नसणे ही बाल रूग्णाचे दुदैव असल्याचे बोलले जाते.



